जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday 29 December 2010

क्रेपे (युरोपीयन डोसा)

परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले . ;)

साहित्यः


३/४ बाऊल मैदा/गव्हाच पीठ.
१ अंड.
१/२ कप दुध.
सोडा (पिण्याचा. तोच जो मोठी माणस कसल्याश्या रंगीत द्रव्यात टाकुन घेतात तो.)
मीठ चवीनुसार.
१ चमचा साखर्/पीठी साखर
येवढ्या प्रमाणात ५-६ क्रेपे तयार होतात.



नॉन्व्हेज स्ट्फिंगसाठी : चिकन
व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.)
गोड स्ट्फिंगसाठी : फळांचा जॅम, मुरंबा.
बाकी तुमच्या तेब्येतीला मानवत असल्यास चीज् ,बटर.

कृती:


एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं


ते मिश्रण आराम करतय तो वर स्टफिंगची तयारी करावी.
१ चमचा तेलावर, मश्रुम आणि बोनलेस चिकनचे छोटे तुकडे करुन त्यांना मीठ, मसाला, हळद, हिरव वाटणं लावुन मधम आचेवर १० मिनिटं परतुन घावे.



कडकडीत तापलेल्या तव्यावर एक डाव पीठ ओतुन तवा सगळ्या बाजुंनी फिरवुन घ्यावा जेणे करुन मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आच मध्यम करुन १-२ मिनिटे शिजु द्यावं




कडा सुटायला लागल्या की उलथण्याने उलटुन दुसरी बाजू पण १-२ मिनिटे शिजु द्यावी.



ज्याच्या त्याच्या आवडी नुसार त्यात हवं ते स्टफिंग टाकुन रोल करावे.
गोड आवडणार्‍यांनी बटर लावुन जॅम, मुरांब्याचा थर द्यावा.
नॉन्व्हेज प्रेमींनी मॅगी चा भुना मसाला / झण्झणीत चटणी चा कोट करुन त्यावर चिकन्/भाज्या टाकुन रोल करावा.



हा पदार्थ गरमागरम खाण्यातच मजा आहे. :)

Tuesday 28 December 2010

भरलं वांगं (बेक्ड)

वांग्याच नाव काढल्यावर बरेच जण तोंड वाकड करतात. माझ तस एक शेपूची भाजी सोडली तर बाकी कुणाशी वाकड नाहीये. त्यामुळे जे काही ताटात येत त्याला उदार मनाने उदरात जगा देतो.
सध्या मस्त वांग्याचा सिझन आहे. तशी इकडे जवळ जवळ वर्षभर वांगी मिळतात. पण ही असली मोठ्ठी वांगी इथे ठरावीक सिझन मध्येच येतात. नेहमी सारख वांग्याच भरत किंवा काप करुन तळण्या पेक्षा या वेळी काही तरी नवा प्रयोग करावासा वाटला. सद्ध्या बेकिंगच खुळ डोक्यात बसलय. आजची पाककृती ही त्याचीच परिणीती आहे. Smile

तर मग आपला बहुमुल्य वेळ न दवडता लगेच पाककृती कडे वळतो.

साहित्यः

केक सारख याच काही ठरावीक पदार्थ आणि माप नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला आवडतील /उपलब्ध असतीतल त्या भाज्या घ्या. पण वांग मात्र हवच हव.

१-२ मोठ्ठी वांगी. (किती माणस आहेत त्या प्रमाणात.)
१ वाटी मटार दाणे.
२ मध्यम आकाराचे बटाटे.
५-६ मश्रुम.
१ वाटी फ्लॉवर. (जीतका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरुन.)
३-४ टॉमेटो.
३ लसणाच्या पाकळ्या.
१/२ इंच आलं.
१ भोपळी (सिमला) मिरची.
ब्रेडचा चुरा.
चीज.
तेल.
मीठ चवी नुसार.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा मसाला, १ चमचा जिरे पुड.

कांदा सध्या ईकडे पण दुप्पट महाग झालाय. मी गडबडीत घ्यायलाच विसरलो. जर तुमची ऐपत असेल तर घ्या एखादा वासा पुरता. Wink

५-६ मोठ्या कोलंब्या (ऑपशनल)
(कोलंब्यांना हिरव वाटण, मीठ, मसाला, हळद, आणि लिंबाचा रस लावुन २०-२५ मिनीटं मुरत ठेवाव. )

कृती:


मी एक वांग उभ चिरुन दोन भाग करुन घेतले . तर दुसर्‍याला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे आडवे चरे दिले आणि ते मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवलं.
फ्लॉवर, टॉमेटो, आल, लसुण, मिरची बारीक चिरुन घेतल. बटाटा कचाच खिसुन घेतला. मश्रुमचे उभे काप करुन घेतले.


ओव्हन २०० °C वर १० मिनिटं तापत ठेवला.
अर्ध्या कापलेल्या वांग्याला तेलाच बोट लावुन ते ओव्हन २५ ते ३० मिनिटं भाजुन घेतल.

थोडं थंड झाल्यावर चमच्याने आतला गर काढुन घेतला. आणि उरलेल वांग बाजुला ठेवुन दिल.

एका कढईत, २ चमचे तेलावर लसुण, आल परतुन घेतल आणि मग त्यात सगळ्या भाज्या (टॉमेटो सोडुन) टाकुन परतुन घेतल्या.

मग त्यात मीठ, मसाले टाकुन चांगल ढवळुन घेतल. वर एक झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढली.

मग त्यात टॉमेटो टाकुन परतुन घेतल.

१-२ मिनिटांनी त्यात मगाशी वांग्यातुन काढुन ठेवलेला गर टाकुन परत एकदा मोठ्या आचेवर चांगल परतुन घेतल.

नंतर त्या अर्ध्या केलेल्या वांग्यात (खोबणीत) वरच सारण भरल. वरुन थोडा ब्रेडचा चुरा भुरभुरला. आणि मग त्यावर चीज खिसुन टाकल.

आणि हे वांग ओव्हन मध्ये अजुन २०-२५ मिनिट बेक करायला ठेवल.

हे करत असतानाच कोलंब्या तव्यावर अगदी १-२ मिनिटं मोठ्या आचे वर परतुन घेतल्या.

नंतर ते मिठाच्या पाण्यात ठेवलल वांग घेउन त्याच्या चिरांमध्ये सारण भरल. एक खाचे आड एक कोलंबी आणि टॉमेटोच्या चकत्या ठेवल्या.

नंतर हे वांग ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे २००-२५० °C वर बेक करत ठेवल.

हे ते पहिलं उभ चिरलेल वांग बेक केल्या नंतर.

आणि हे नॉव्हेज वर्जन थोड्याश्या सजावटी सोबत.
शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता?

समस्त आंतरजालिय स्नेहांकितांना माझ्याकडुन नाताळाच्या आणि येणार्‍या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आठवणींतले दिवस

२५-३० वर्षांमागचे ते दिवस आजही तसेच आठवतात. सुट्टी लागली की दुसर्‍या दिवशी गावी पळायचो, मग ती दिवाळीची असो, गणपतीची वा मे महिन्याची. सुदैवाने आजोळ पण याच गावात, अगदी चार उंबर्‍या पल्याड आईच माहेर. आईच्या माहेरचा गोतावळा मोठ्ठा. आईला पाच सख्खे काका आणि एक आत्या. त्यासगळ्यांना किमान ४ मुलं. आता इतक्या मावश्या आणि मामांची मुलं सगळी जमलो की नुसता कल्ला व्हायचा. काही जणांची आजोळं वेगळ्या गावी असल्याने त्यांची सुट्टी विभागली जायची. पण मी आणि बहिण या बाबतित भाग्यवान. प्रत्येक सुट्टीच अस वेगवेगळ वैशिष्ठ्य आसायच. निसर्गाने पण मुक्तहस्ताने उधळण केली आहे माझ्या गावावर. सुरुच्या बना मागे रम्य सागरतीर आहे. नारळी-पोफळी -चिकूच्या बागा आहेत. एक छानसा तलाव पण आहे. अरे हो गावाच नव सांगायच राहीलच. नरपड. मला मोठा अचंबा वाटायचा की हे कसल विचित्र नाव.

गावच घर तस ऐसपैस कौलारु. मागे गाई-गुरांनी भरलेला गोठा. पुढे अंगण. त्यात तुळशी वृंदावन. अंगणाला ठेवाच (निवडुंगाच) कुंपण. शेणाने नियमीत सारवलेल घर, ओसरी, पडवी . घरातच एका कोपर्यात लाकडी जिना, वर माळ्यावर जायला. माळ्यावर भाताची २ भली मोठी कणगी. ४-५ मोठ्ठाले रांजण. त्यात चींच , आंबोशी, खारातले आंबे,भोकर आवळे, लोणचीं असा खाऊ. बाकी बरिचशी अडगळ. मे महिन्यात अडगळ साफ करुन तिथे पेंडा पसरला जायचा आणि त्यात आंबे पिकायला ठेवले जायचे. मग मनाला येइल तेव्हा माळ्यावर जाउन आंबे घेउन यायचो आणि मग ते चोखत चोखत गावभर भटकायचो. द्रौपदीच्या थाळी सारख म्हाणा वा अर्जुनाच्या अक्षय भात्यासारख वरदान त्या माळ्याला होतं.

गावात बर्‍याच जणांच्या वाड्या आहेत. आमचाही छोटी वाडी आहे, पण त्यात आजी- आजोबांनी नंदनवन उभ केल होतं. काय न्हवत त्या वाडीत? चीकु,नारळी-पोफळी-ताड, खाजरी (खजुराची झाड),आंबे,काजू,फणस,पेरु, काळी जांभळ, सफेद जाम, केळी. वाडितच एक मोठी विहिर होती आणि अवाडी (छोटा हौद. साधरण ६ x ६ x ४ चा असेल.) विहिरीतल पाणी या अवाडीत सो डल जायचं. आणि मग अवाडितुन ते पाणी पाटात सोडल जाई. मग त्या मुख्य पाटाला फाटे पाडुन आख्या वाडीत सिंचन केल जायच. पावसाळ्यात भाताच मुख्य पीक आणि इतर वेळी वेगवेगळ्या भाज्यांच उत्पादन घेतल जायच.


फेब्रुवारी-मार्च मध्ये तेव्हा गावाला बर्‍यापैकी थंडी आसायची. सक्काळी जाग यायची ती कोंबड्याच्या आरवण्याने किंवा वासराच्या हंबरण्याने. गडी गाईची धार काढत आसायचा. चरवीत धार पडताना होणारा चुर्रर्रर्रर्रर्र... आवाज. खुप मज्जा वाटायची पहाताना. धार काढुन झाली की मग आम्ही वासराला सोडायचो. कसला जोर आसायचा त्या वासरात आम्हालाच ताणकटत न्यायच ते. बाबांनी एकदा आईची गम्मत सांगीतली होती. आई नविनच लग्न होउन घरी आली होती. तेव्हा एक पांढरी गाय होती, ती शेतातुन चरुन आली की आज्जी तिला नेहमी कहिना काही खायला घालायची. एक दिवस आज्जी घरात न्हवती. ही बया शेतातुन आली आणि वाट बघत राहिली कि आत्ता काही तरी मिळेल म्हणुन. आई घर कामात मग्न होती, इतक्यात मागुन कसलासा थंड खरखरीत स्पर्श झाला, आईने दचकुन मगे पाहिल आणि मोठ्ठी किंकाळी फोडत हातातल काम टाकुन बाहेर पळाली. गाय पण बिचारी आईच्या मागे माजघर, स्वयंपाकघर, दिवाणखाना पार करत करत पार अंगणात आली. तिला तीथे पाहुन आईने मागच्या रस्त्याने परत घरात प्रवेश केला तर ही बया पण मागे मागे आली. अश्या तीन प्रदक्षिण झाल्या. या दोघींची पकडा पकडी अशीच चालली असती पण तेवढ्यात आज्जी आली आणि तिने आईला या प्रसंगातुन सोडवल.
गाईच दुध काढुन झाल की मग हातात राखुंडी घेउन दात घासण्याचा कार्यक्रम व्हायचा. तोंड धुवायला नी चुळ भरायला परसातल्या विहिरीवर जाव लागायच. कसल थंड पाणीते सर्रर्र करुन अंगावर काटा यायचा. मग नुसत ओठांना आणि पापण्यांना पाणी लावल की झाल तोंड धुवुन Smile . हे सगळा आटपेस्तो आज्जी आणि आईने न्याहारी करुन ठेवलेली असे. शहरातल्या सारखे पोहे, उपमा नाही. शक्यतो तांदळाच्या भाकरी बरोबर, कधी कांदा कवट (कांदा+अंड भुर्जी), चुलीत भाजलेला पापड किंवा सुका बोंबील + मुठीने फोडलेला कच्चा कांदा, रात्रीच मुद्दाम उरवलेल ओल्या बोंबलाच कालवण. जोडिला भाताची कांजी (पेज.) शेतातल्या गड्यांसाठी आज्जीचा सगळा स्वयंपाक सकाळी साडेसातलाच तयार आसायचा. त्यामुळे पेज मिळायची कधी केळीच्या बोंडाची भाकरी, कधी ओले बोंबिल घालुन बनवलेली तर कधी माडाच्या ताडीत भिजवुन केलेली भाकरी (पॅन केक्स).

सकाळी असा भारी नाश्ता झाला की १० चाकी लिमोझीन वाट पहात दारात उभी असे. आज्जी गड्यांच जेवण बांधुन द्यायची. आमच्या सुट्टीत गाडीवानाला सुट्टी मिळायची. आम्हीच हाकायचो गाडी. बैलांना रस्ता तोंडपाठ असल्याने काही अडचण यायची नाही. गाडी पुढे गाई करवल्यांसारख्या डुलत डुलत चालायच्या आणि आमची वरात निघायची वाडीत. तिथे बरेच खेळ चालायचे. लपंडाव, बेचक्या घेउन नेमबाजी, नारळीचे थोपे कापुन त्याचे बैल बनवायचो. चीकण मातीची चाक बनवुन २-३ दिवस सुकवायचो नी मग त्याच्या खेळण्यातल्या बैल गाड्या बनवुन थोप्याचे बैल जुंपुन उनाडत बसायचो. कधी छत्रीच्या काड्यांच धनुष्यबाण बनवुन एक शहाळ उतारावरुन गडगडत सोडायचो आणि बाण मारुन ते अडवायचो. एकदा विहिरीजवळच आजोबांनी थोडी जागा साफसुफ करुन दिली. त्या जागेत त्यांनी लहान रोप लावुन आम्हाला वाडी करायला शिकवल. मग रोज त्या झाडांना डबर्‍यारुन पाणी घालायचा कार्यक्रम व्हायचा. कुणाच झाड किती वाढतय यात पण चुरस लागायची. अशी अंगमेहेनत करुन घामाने निथळलो की पटापट अवाडीत उड्या टाकुन तास दोन तास पाण्यात खेळ चाले. मग कोण किती वेळ पाण्यात बुडुन राहातो किंवा हातपाय न हलवता कसा तरंगतो यावर शर्यती लागत. डुंबुन डुंबुन भुका लागायच्या की मग आमचा मोर्चा रानमेव्या कडे वळायचा. त्या त्या सिझन प्रमाणे मग आंबे-कैर्या, सफेद जाम, जांभळ, पेरु, काजु, खाजरं, राजनं, करवंद, आवळे ,बोरं अश्या फळांचा फन्ना उडायचा. आणि अर्थात तहान लागल्यावर शहाळ्याच गार पाणी नी जोडीला साई सारख मऊ खोबर. उन्ह डोक्यावर आली की घरुन गडीमाणसा सोबत जेवण यायच. कधी लहर आली तर सकाळी येतानाच बरोबर शिधा आणला जायचा आणि मग तीन दगडांची चुल मांडुन वनभोजनाचा कार्यक्रम व्हायचा. जेवुन तृप्त झाल्यावर एखाद्या झाडा खाली झावळी विणुन केलेल्या चटईवर ताणुन द्यायची कीवा मग झाडाच्या फांदीला दोर टांगुन तात्पुरता झोका बांधुन त्यावर झुलत बसायच. कुण्या मोठ्याच लक्ष नाही अस बघुन हळुच आपट्याची पान वाळुन मस्त झुरका मरायचा Wink

सावल्या लांबायला लागल्या की गाई-गुर हंबरुन घराकडे निघायची वेळ झाल्याची सुचना द्यायची . मग गाडीजुंपुन आमची नावऴ निघायची. पण जाताना रिकाम्या हातने कधीच नाही. टोपल्यांत बराच रानमेवा गोळा केलेला आसायचा. घरी आल्या त्याच्या वाटण्या व्हायच्या. मग ओटीवर बाकडं टाकुन प्रत्येक जण आपापल दुकान मांडायचा. मग गावातली - जवळच्या पाड्यावरची आदिवासी मुल हा मेवा विकत घ्यायला यायची. प्रत्येक फळामागे ५ -१० पैसे मिळायचे. आरामत ४-५ रुपये सुटायचे. हा आमचा पॉकेट्मनी. मग संध्याकाळी समुद्रावर रपेट व्हायची. मामा मावश्या सगळे एकत्र जायचो. मामाच्या मागे हट्ट करुन समुद्रावरच्या पोलिसमामाच्या दुकानातले वडे, उसळ आणली जायची. मग वाळुत किल्ले बनवण, पकडापकडी, रिंगण गाण्याच्या भेंड्या असे खेळ व्हायचे. कधी खेळायचा कंटाळा आला तर मुली शंख शिंपले गोळा करत बसायच्या आम्ही खेकडे पकडायला खडकात जायचो.

तेव्हा टी.व्ही. च खुळ गावात पोहोचल न्हवत. ओटीवर आजोबांची आराम खुर्ची होती (या खुर्ची वर बसण्यासाठी आम्हा बहीण भावंडात काय चुरस आसायची) . अंगणात खाट टाकली जायची , जेवण आटोपली की घरातले सगळे पुरुष अंगणात जमायचे. बायका मंडळीपण स्वयंपाक घरातल आवरुन यायच्या. हवेत मस्त गारठा आसायचा. मोठ्यांच्या गप्पा गोष्टींना हळु हळु पुनवेच्या समिंदरासारखी भरती यायची. एखाद्या विनोदावर फेसाळलेल्या लाटेसारखे हसु फसफसायच.
आम्हा लिंबु-टींबु लोकांचा तोवर वेगळाच उद्योग चालायचा. आम्ही लाकाडं-काटक्या, वर्तमानपत्राचे कपटे गोळा करायचो. अंगणातल्या खाटे समोर हा ढिग रचुन शेकोटी पेटवली जायची. आमचा मेहताना म्हणुन आज्जी आम्हाला गोष्टी सांगायची, त्या राजा-राणी तल्या गोष्टींत आम्हाला मुळीच रस नसायचा, भुता-खेताच्या, चमत्कारी गोष्टींसाठी गलका व्हायचा.
गावाच्या मध्यावर एक पिंपळाचा पार आहे. १५०-२०० वर्षांच झाड असेल. झोटींग त्याच नाव. ग्राम देवता आहे ती. तर या झोटींगातुन म्हणे अमावस्येला रात्री १२ वाजता एक काटकी बाहेर येते आणि तिच एका पांढर्या शुभ्र घोड्यात रुपांतर होत. मग तो घोडा आख्या गावाला प्रदक्षिणा घालत पहारा देतो. ही गोष्ट अगणित वेळा ऐकुनही, दर वेळी तेव्हडीच उत्सुकता आसायची. आज्जी तिच्या सासर्‍यांची गोष्ट सांगायची. त्यांच्या अंगात म्हणे हा झोटींग यायचा. गावकरी त्याची पुजाकरायचे, नीट पाउस पाणी पडुदे म्हणुन नवस बोलायचे. मग हळु हळु गाडी चमत्कारी गोष्टींवरुन भुताच्या गोष्टींवर यायच्या की मग आमची पांगा पांग. मग कुणी आईच्या कुशीत दडलय, कुणी आज्जीच्या तर कुणी बाबांच्या मागे. गोष्टीं ऐकत ...आकाशातले तारे मोजत तिथेच डोळा लागायचा.

ऐन दिवाळीच्या दिवसात तर खुप धामधुम आसायची. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे पहाटेच उठाव लागायच . त्यात मी मी म्हणणारी बोचरी थंडी. अंथरूणातुन बाहेरच यावस वाटायच नाही. मग बाबा कान धरुन उठवायचे ते तडक विहिरीवर. चुलीवर पाणी तापत ठेवलेल आसायच. मग आई किंवा बाबा उटण चोळुन आंघोळ घालायचे. पाणी तापलेल आसायच पण ते उटण बर्फा सारख गारे गार. अस्सा काटा यायचा की ज्याच नाव ते. मग पंचा गुंडाळुन दातावर दात वाजवत विहिरी पासुन घारा पर्यंत धुम ठोकायची. त्या नादात नक्की कुठे तरी ठेच लागायची आणि त्या थंडीत पाय अजुनच ठणकायचा. नविन कपडे घालुन घरताल्या सगळ्या वडिलधार्‍यांना , देवाला नमस्कार करुन पहीला फटाका फोडायला एकच धावपळ व्हायची. ओटी शेणाने सारवलेलि आसायची. घराघरातुन दिवाळीच्या फराळाचा मस्त सुगंध दरवळत आसायचा. नटलेल्या बायका मंडळी रांगोळी काधण्यात मग्न आसायच्या. गावच्या शाळेतर्फे रांगोळीच्या स्पर्धा आयोजीत केल्या जायच्या. मुलही मुलीं इतक्याच इर्षेने भाग घ्यायची. कबड्डीचे सामने आयोजीत केले जायचे. क्रिडा मोहोत्सवाचे आयोजन केले जायचे. रोज गावच्या शाळेच्या पटांगणात करमणुकीची कार्यक्रम व्हायचे. यात गावातल्या हौशी मंडळींना आपली कला सादर कारायचा पुरेपुर वाव मिळायचा. नाटकं बसवली जात. गाण्याचे नाचाचे कार्यक्रम व्हायचे. शेवटच्या दिवशी स्नेहवर्धक मंडळाची सभा व्हायची त्यात सामाजीक शैक्षणीक क्रिडा क्षेत्रातल्या विजेत्यांचा सत्कार केला जायचा.

मी तिसरी चौथी असतानाच्या दिवाळितली आठवण आहे. तेव्हा विजेच्या तोरणांच फॅड न्हवत. मातीच्या नाही तर ठेवाच्या(निवडूंगाच्या) पणत्या आसायच्या. आम्ही सगळे संध्याकळी फटाके उडवत होतो. सुरसुरी पेटवली की तीची हाताकडची तार वाकडी करुन हुक बनवायचा आणि मगे ती पेटती सुरसुरी झाडावर उडवायची. मग ती कुठेतरी फांदीला अडकायची. अश्या ४-५ सुरसुर्‍या अडकल्या की मग ते झाड मस्त चमचमताना दिसायच. तर हा खेळ चालु असताना तायडीने असा नेम धरलाकी ती सुरसुरी झाडा ऐवजी थेट गोठ्यात जाउन पडली. कापणी होउन गेलेली त्यामुळे गोठ्यात पेंडा ठासुन भरलेला. बर इरका प्रकार झालाय तर ही कुणाला सांगेल तर ते पण नाही. पेंडाच तो ...तो का पेटायचा राहतोय? आग वाढली तस कुणाच तरी लक्ष गेल नी मग जी धावपळ उडली की काय वर्णाव. कळशी, हांडे, बादल्या, भांडी, पेले, जे मिळेल त्याने पाण्याचा मारा केला नी काही मोठी हानी व्हायच्या आत सगळ प्रकरण आटोक्यात आणल. मग आजोबांनी आणि बाबानी सगळयांना अस झापल की विचारता सोय नाही. पण म्हणुन काय आम्ही फटाके फोडायचे राहीलो नाही. २-३ दिवसा नंतरचीच गोष्ट. या वेळी मी पराक्रम केला. सुरसुर्‍या वाकड्या करण्यावर बंदी आली होती. त्यामुळे जगमान्य रीती प्रमाणे त्या उडवत होतो. माझ्या हातातली सुरसुरी जरा जास्तच तडतडत होती, एक दोन ठिणग्या हातावर उडाल्या तशी मी घाबरुन हात झटकला. त्या सुरसुरीने जे उड्डाण केल ते थेट आजोबांच्या धोतरावर. दांडी वरल्या न्हवे त्यांनी घातलेल्या. हे राम, आजोबांची पळताभुई थोडी झाली. बाबांकडुन सडकुन मार मिळणार होता, पण आजोबांनीच वाचवल. तेव्हा पासुन मोठा होईपर्यंत फुलबाज्या, अनार, भुईचक्र, अॅट्म बाँब असल्या डेंजरस फटाक्यांकडे पाहिलपण नाही. बंदुकीने, दगडाने नाही तर हतोडीने टिकल्या फोडणे, सापाच्या गोळ्या पेटवणे असले प्रकार करायचो.

होळीच्या सुमरास बर्‍यापैकी भाजीपाला आसयचा वाडीत. आणि तेव्हा आज्जीची उकडहंडी ची भाजी हि ठरलेलीच. बाबा परसातल कोनफळ खणुन काढायचे. एका मोठ्या हांडीत ही भाजी केली जायची. वाडीतुन कडवा वाल, पापडी, वांगी, पाती कांदे, रताळी हा कच्चा माल यायचा. सगळ्या भाज्यांची एक मिश्र भाजी केली जायची. त्या भाजीची चव अजुन जिभेवर आहे.

आज गाव बदललय. घरं नीट नेटकी झाली. शेणाने सारवलेल्या जमिनी जाउन लाद्या, मार्बल आले. कौलं उडुन स्लॅब पडलेत. गोठा गाई-गुरांशिवाय ओस पडलाय.
सहावर्षांपुर्वी आजोबा गेले. त्यांना साथ देत दुसर्‍याच वर्षी आज्जी आम्हाला पोरक करुन गेली. Sad आताशी कुणी अंगणात जमत नाहीत. माणसच हरवली आहेत तिथे खाटांच काय.
काल इथे बाजारात कोनफळ दिसलं. आज्जीच्या उकडहंडीची आठवण झाली. भाग्य माझ आज्जीची ती रेसीपी आई शिकली, आणि तिच्या कडुन आमच्या पर्यंत पोहोचलीये. उद्या माझ्या लेकीला ही शिकवेन. वारसा आसाच चालवतात ना Smile


शीरखुर्मा

सलाम-आलेकुम मियाँ . भोत दिनो के बाद दिखरैले. क्या बोल्ते आप इधरीच कु थे. मैंच नै दिक्खा? हां बराबर जी. मेरे रोजे चल रे थे ना.
भाईजान, बडी बी और चिल्ली पील्ली सब खैरीयत मै ना?
अरे हौ,आप को भी को ईद मुबारक भई.

घर को चल्ते? बडी प्यार से शीर-खुर्मा बनायें जी. चख लेते थोडा.
क्या बोल्ते गणपती की तैयारी करनेकी. हौ मियाँ गणेशजी हमारे मुहल्लेमें बैंठतेजी. बहुत मझा आता.

क्या बोले? कैसे बनाते शीर-खुर्मा ? गणेशजी को प्रशाद चढाने के वास्ते भाभी को बनानेकू बोल्ते. बतातै ना मियाँ, बिल्कुल बतातै. आप सिखाये मोदक आपकी भाभी बनाने वाली है जी. बहुत शुक्रिया.

शीर-खुर्मा भौत सिंपल है जी. और बनता भी एकदम १०-१५ मिनट मे.

पैले सामान क्या क्या लगता लिखलो मियाँ.


१/२ पाकिट सेवैंया. (भुनी हुई मिली तो और्भी अच्छा. वर्ना फिकर नक्को करु. मै बाताता ना.)
३/४ लिटर दुध.
अगर घर मै हो तो मिठा गाढा दुध. (कंडेंस्ड मिल्क).
१/२ बाटी चीनी. हा हा हा मियाँ बाल्टी नक्को लिक्खू हा वर्ना भाभी जी पिटती मेरेकु बाद मै.
२ बडे चम्मच चावल का आटा.
सुका मेवा. (इसमे कंजुशी नक्को करु मियाँ.)
(बादाम-काजु-किशमिश-पिस्ते-बिगोये खारीके टुकडे)
ईलायची.
जायफल.
नारियल के छोटे टुकडे.

अगर आपको भुनी हुई सेवैयाँ ना मिली तो. एक बर्तन में २ चम्मच अस्सल देसी घी डालकर साधी सेवैंयाँको उसमे ३-४ मिनटं भुन लो. जादा तेज आंच पर नक्को करु. वर्ना जल जायेंगी. फिर उन कु एक प्लेट मै निक्काल के रक्खो.



अब उसी बर्तन में दुध को उबालने रक्खो जी. उंस में उबाल आते ही. शक्कर, गाढा दुध पीसी हुई ईलायची- जायफल, नारियल के टुकडे और बाकी का सुका मेवा डाल दो. आंच को जादा तेज नक्को रखुं. चम्मच से बार बार हिलाते रक्खो.



५ मिनट बाद उस में भुनी हुई सेवैयाँ डाल दो. साथ में चावल का आटा थोडे दुध मे भिगोकर डाल दो. और चम्मच से बराबर हिलाते रक्खो. २-३ मिनट मै आपकी शीरखुर्मा गाढी हो जायेगी.



उपर से थोडा और सुखा मेवा डाल कर गणेशजी को चढावा दो जी.
हमकु आरती मे बुलाना भुलो नक्कु .

खुदा आफिस मियाँ. आपा को सलाम बोल्ना.

फिर मिलते इधरीच.

पेप्पर चिकन

साहित्य:


१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला.
८-१० लसुण पाकळ्या ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या.
४-५ मिरच्या उभ्या चिरलेल्या.
१/२ लिंबु.
२-३ चमचे काळीमीरी पुड. (बारीक आणि भरड दोन्ही)
कडिपत्ता.
१ चमचा हळद.
२ चमचे सोया सॉस.
मीठ चवी नुसार.
२ चमचे तेल आणि तुप.



१/२ ते ३/४ किलो चिकन मध्यम आकारचे तुकडे करुन आणि मीठ लावुन १०-१५ मिनिटे मुरत ठेवलेले.


कृती:



लसुण तेला तुपावर २ मिनिटं परतुन घ्यावा.



मग त्यात कडिपत्ता, कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकुन परत २ मिनिटं मोठ्या आचेवर परतुन घ्यावे.



कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिकन चे तुकडे टाकुन मध्यम आचेवर परतुन, झाकण लावुन १०-१२ मिनिटे शिजवत ठेवावं.



नंतर त्यात हळद, सोयासॉस,लिंबाचा रस आणि चवी नुसार मीठ टाकुन परत ५ मिनिटे झाकण लावुन शिजु द्यावं.



५ मिनिटांनी झाकण काढुन, मोठ्या आचेवर पाणी आटे पर्यंत परतत रहावं.
पाणी संपुर्ण आटल्यावर त्यात काळी मीरी पूड टाकुन मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतुन घावं.


गरमागरम पेप्पर चिकन.